श्री समर्थ श्रीधर गोशाळा ही संस्था पंचगव्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे देशी गाईंचे संवर्धन, संगोपन आणि पंचगव्य उपचार पद्धतीवर संशोधन करणे हा आहे. गाई हा आपल्या संस्कृतीचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा मूलभूत आधार आहे. गोशाळेचे प्रमुख ध्येय देशी गाईंचे रक्षण आणि संवर्धन असून, आयुर्वेदाच्या आधारावर पंचगव्य उपचारांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यावर भर दिला जात आहे. डॉ. अनुपमा उम्राजकर या वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळा पंचगव्य उपचारांचा उपयोग करून मानवी आरोग्यासाठी नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय विकसित करत आहे. आयुर्वेदातील शाश्वत ज्ञान आणि गोमातेच्या पंचगव्य तत्त्वांचा संगम साधण्याचा हा एक पवित्र प्रयत्न आहे. गोशाळा सध्या देशी गाईंच्या दुर्मिळ प्रजातींचे रक्षण व संगोपन करण्यासाठी कार्यरत असून, गाईंना सकस चारा, योग्य औषधोपचार आणि निवासासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या पवित्र कार्यासाठी आम्ही गोसेवक, दानशूर व्यक्ती आणि संस्था यांचे सहकार्य अपेक्षित आहोत. आपले दिलेले योगदान गोशाळेच्या मूलभूत सुविधांसाठी, गोसेवा आणि सामाजिक आरोग्यासाठी अत्यंत मोलाचे ठरेल.