श्री समर्थ श्रीधर गोशाळा ही संस्था पंचगव्याच्या माध्यमातून समाजाच्या सर्वांगीण कल्याणासाठी विविध उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांचा मुख्य उद्देश म्हणजे देशी गाईंचे संवर्धन, संगोपन आणि पंचगव्य उपचार पद्धतीवर संशोधन करणे हा आहे. गाई हा आपल्या संस्कृतीचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा मूलभूत आधार आहे. गोशाळेचे प्रमुख ध्येय देशी गाईंचे रक्षण आणि संवर्धन असून, आयुर्वेदाच्या आधारावर पंचगव्य उपचारांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्यावर भर दिला जात आहे. डॉ. अनुपमा उम्राजकर या वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक आणि संशोधक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळा पंचगव्य उपचारांचा उपयोग करून मानवी आरोग्यासाठी नैसर्गिक आणि पारंपरिक उपाय विकसित करत आहे. श्री समर्थ श्रीधर गोशाळा सुरू करण्या पाठीमागे खूप मोठा हात मंगेश कुलकर्णीचा आहे मंगेश आणि डॉ. अनुपमा हे स्वामींचे समर्थांचे अनुग्रहित नतमस्तक श्रद्धास्थान हे एकच… आम्हाला दोघांनाही स्वामींकडून असे संकेत होते की गो सेवा करावी संकेत आल्यानंतर आम्ही दोन ते तीन गोशाळेंना भेटी दिल्या.
गाईंची सेवा हा एक सेवाभाव अतिशय जिव्हाळ्याचा विषय आणि लहानपणी असताना गाईंची सेवा केल्यानंतर पुण्य मिळते हा एक मनातला विचार आणि स्वामींकडून मिळालेले संकेत याच विचारांना सोबत घेऊन आम्ही गोशाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला गाठीशी कुठलाही तसा अनुभव नव्हता तसे म्हणायला गेले तर डॉ. अनुपमा माहेरी गाई म्हशी होत्या पण प्रत्यक्ष काम कधी केलेलं नाही त्यांचं जवळून दुखणं आजारपण वासरू झालेला क्षण हे सगळं मी पाहिलेलं होतं आणि तसेच मंगेश कुलकर्णीचा पण सज्जनगडावरती वेदपाठ शाळेत शिक्षण घेत असताना हे जवळून पाहिलं होतं पण पाहणे आणि प्रत्यक्ष त्यात कृती करणे खूप अंतर असते
पण स्वामी संकेत हाच आदेश म्हणून आम्ही पुढे जाण्याचं ठरविले आणि 4 डिसेंबर 2020 या दिवशी श्री समर्थ श्रीधर गोशाळेची आम्ही स्थापन केली 1000 स्क्वेअर फिट मध्ये आम्ही एक शेड उभारले गोशाळेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्हाला वेदमूर्ती श्री महेश वझे गुरुजींचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत गेले आणि आजही ते लाभत आहे.
उपोषणाचे पहिले शेड हे तळेगाव मध्ये माऊली नगर येथे शिंत्रे गुरुजी यांच्या घरी उभारले गेले शिंत्रे गुरुजींनी गो सेवेसाठी आपली जागा गो सेवेसाठी मोफत दिली पण गोशाळेत येणारे अनुभव चाऱ्यांचा प्रश्न आर्थिक चणचण या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला गोशाळा चालवण्यास जड जात होते या ठिकाणी कुठलीही आम्ही आर्थिक मदत सरकारकडून किंवा इतरांकडून न घेता मंगेश आणि मी स्वखर्चातून गोशाळा चालवत होतो काही कारणास्तव आम्हाला माऊली नगर कामशेत मधली जागा सोडावी लागली आणि आम्ही काही काळा पुरते कासारासाठी येथे गोशाळा हलवली. अतिशय अडचणीतून आम्ही गोशाळा सुरू ठेवली यामध्ये कुठलाही व्यवसाय हा दृष्टिकोन न ठेवता फक्त सेवाभाव यावरती गोशाळा सुरू होते अडचण येत असली तरीही स्वामी संकेत असल्यामुळे गोशाळा बंद करण्याचे विचार आमच्या दोघांच्याही मनात कधीच आले नाहीत स्वामी सोबत आहेत ही वेळोवेळी एकमेकांना वाटणारी खात्री हाच आमचा पॉझिटिव्ह पॉईंट होता आणि तोच पॉझिटिव पॉईंट पुढे नेऊन आजतागायत गोशाळा उभी आहे
गेल्या तीन वर्षांपूर्वी आम्ही नाणे गावामध्ये गोशाळा हलवली आहे. आमचा गोशाळे कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा पूर्णपणे सेवाभाव आणि अध्यात्मिक दृष्टिकोन होता आणि आहे…
भगवान श्रीधर स्वामी महाराज हे महाराष्ट्रातील एक महान संत, आध्यात्मिक गुरु आणि समाजसुधारक होते. त्यांचे जीवन म्हणजे परमेश्वरभक्ती, गोरक्षण, साधना आणि सेवा यांचा जिवंत आदर्श आहे. त्यांनी आपल्या जीवनातून भक्तांना ईश्वरप्राप्तीचा सरळ मार्ग दाखवला – तो म्हणजे नामस्मरण, सेवा आणि समर्पण.
“गाय म्हणजे संस्कृती. गोसेवा म्हणजे ईश्वरसेवा.”
“नावस्मरण, सेवा आणि नम्रता हेच खरे साधनाचे मार्ग आहेत.”
डॉ. अनुपमा उम्रजकर या श्री समर्थ श्रीधर गोशाळा या उपक्रमाच्या संस्थापिका आहेत. २०१९ साली भगवान श्रीधर स्वामी महाराज यांच्याकडून आलेल्या दिव्य प्रेरणेनुसार त्यांनी गोशाळेची स्थापना केली. त्या पंचगव्य एम.डी. असून, आयुर्वेद आणि भारतीय पारंपरिक ज्ञानाच्या अभ्यासक आहेत.
विजयानंद संस्था, पुणे येथील ट्रस्टी असलेल्या डॉ. अनुपमा यांनी आपले संपूर्ण जीवन गाय संरक्षण, पंचगव्य उपचार संशोधन आणि ग्रामीण सशक्तीकरण यासाठी समर्पित केले आहे. त्यांचे ध्येय फक्त गोमातेचे रक्षण नव्हे, तर गाय, शेतकरी आणि समाज यांच्यात समतोल साधणारे स्वावलंबी जीवनमूल्य निर्माण करणे आहे.