श्री समर्थ श्रीधर गोशाळा येथे आम्ही पंचगव्य आणि आयुर्वेद यांचे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधन करून, समाजाच्या गरजेनुसार हे उपचार पद्धती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत.
आमच्या गोशाळेमध्ये मोफत ओपीडी सेवा चालू असून, पंचगव्य आधारित नैसर्गिक औषधोपचार दिले जातात. औषधांच्या किमती नाममात्र ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून सामान्य माणसालाही उपचार घेता येतील.
आमचे ध्येय आहे – अल्पसंपन्न घटकांसाठी संपूर्ण मोफत उपचार सेवा उपलब्ध करून देणे, आणि ही सेवा समाजातील सक्षम वर्गाच्या सहकार्याने राबवणे.
🙏 आपणास विनंती: आमच्या गोशाळेला प्रत्यक्ष भेट द्या, कार्य पहा, आणि या सेवाभावी उपक्रमात आपले योगदान द्या.
त्रिदोष सिद्धांत हा आयुर्वेदाचा मूलभूत भाग आहे, ज्यात शरीरातील तीन उर्जांचा (वात, पित्त, कफ) समतोल आरोग्यासाठी आवश्यक मानला जातो. या त्रिदोषांचा असमतोल म्हणजे रोग, तर समतोल म्हणजे आरोग्य.
आमच्या पंचगव्य केंद्रात तयार होत असलेला त्रिदोष कक्ष म्हणजे एक विशेष जागा, जिथे:
प्रत्येक डोशासाठी स्वतंत्र भाग असून, संबंधित वनस्पती व पंचगव्य उत्पादने त्यात समाविष्ट असतील.
आपल्या दानातून आम्हाला शक्य होते:
आपले प्रत्येक ₹1 समाजाच्या आरोग्य आणि संस्कृतीच्या संवर्धनाकडे एक पाऊल आहे.